मी एक शेतकरीपुत्र

शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा असे म्हणतात.  खरंच आज शेतकर्‍याला  समाजात प्रतिष्ठेचे स्थान आहे का?  तो देखील समाजातील महत्त्वाचा घटक आहे. तो दिवस-रात्र शेतामध्ये कशाचिही परवा न‌ करता राबतो.  पण त्याच्याकष्टाला कवडीमोलाची देखील  किंमत नाही आपल्या समाजात.

            तो अनेक  संघर्ष करून एखाद पिक पिकवतो. बी-बियाणे, खते, मशागत, मजुरांचा खर्च, ... ईत्यादी.  तो जेव्हा बाजारात आणतो त्याला योग्य भाव नाही मिळत. त्याचा एकूण खर्च देतील निघत नाही. मग काय करणार शेतकरी खचणार नाही तर काय
होणार. त्याच्यामागे देखील सावकाराचे कर्ज असतो, मुलाबाळांचा शिक्षणाचा खर्च असतो, जीवनाच्या गोष्टी , मुलीचं लग्न असतं अशा अनेक गोष्टी असतात.

मग तो आत्महत्या सारखा मार्ग निवडतो. त्याला आर्थिक पाठबळ देणारं कुणीच नसतं

मला एक प्रश्न  पडतो आपण भाजीपाला खरेदी करतानाच काय बरं फारसा विचार करतो. आपण बाकिच्या   गोष्टी खरेदी करताना फारसा विचार करत नाही. तिथे गुपचूप पैसे देतो MRP नुसार. कारण त्याची किंमत ठरलेली असते. मला सांगा शेतकऱ्यांना का अधिकार नाही एमआरपी ठरवण्याचा. का तो त्याच्या मालाची किंमत ठरवू शकत नाही ?
सांगा मला उत्तर हवंय ........



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

युवक असावा असा !

सोलापुरातील अष्टविनायक पहिला गणपती - श्री विर गणपती तथा विरेश गणपती.