आमच्याकडे पदवी (Degree) मिळेल

" परीक्षार्थी बनू नका ज्ञानार्थी बना"

 आपली शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना नुसतं परीक्षार्थी बनवते ज्ञानार्थी नाही. परीक्षा आले की अभ्यास करा चांगले गुण मिळवा, आणि संपलं परीक्षेतील गुणांच्या आपले शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांच मूल्यांकन करते करते.


 परीक्षा नंतर त्या विषयाचं आणि विद्यार्थ्यांचा काही देणं घेणं नसतं. आणि ते आपण तपासत देखील नाही . फक्त पाठांतर करून घेतलं जातं विद्यार्थी पाठ करतात परीक्षा देतात चांगले गुण मिळवतात आणि पदवी मिळतात हेच आमच्या विद्यापीठांचे धोरण आहे.


 आज असंख्य पदवीधारक आहेत पण त्यांच्याकडे कौशल्यच नाही, मग आपणच ओरडत बसतो नोकरी नाही.


 आज आपला अभ्यासक्रम असा तयार केलेला आहे की त्याचा व्यावहारिक जीवनाशी थेट असा काही संबंध नसतो.

 आज-काल विद्यापीठे नुसते पदवी देणारे कारखाने होत चाललेल आहेत. आपली शिक्षण पद्धती नुसत अशी आहे की जर उदाहरणं देऊन सांगायचं झालं तर एका यंत्राला ठराविक काम सांगितलं जातं तर ते यंत्र ते काम करत जातं तेच विद्यार्थ्यांसोबत होतंय ठराविक अ
अभ्यासक्रम आणि ठराविक अशी परीक्षा.

भारतातील लडाख ये सोनम वांगचुक यांनी जो शिक्षण पद्धती मधला मॉडेल मांडलेला आहे तो जर सर्वांनी स्वीकारला तर कुठेतरी बदल घडू शकेल. काय आहे ते मॉडेल ते आपण गुगलवर सर्च करावे.

शिक्षण म्हणजे काय तर तेथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो नैतिक, वैचारिक, भावनिक एक समाजातील चांगली व्यक्ती बनवतो. पण हे कुठेतरी होताना दिसत नाही.

 मग त्यामुळेच आमच्याकडे अनेक पदवीधारक आहेत उच्चशिक्षण घेतले आहेत पण ते एक चांगले नागरिक होऊ शकत नाही.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

युवक असावा असा !

सोलापुरातील अष्टविनायक पहिला गणपती - श्री विर गणपती तथा विरेश गणपती.