सोशल मीडिया

आज-काल सोशल मीडियाचा फार वाईट असा परिणाम होत आहे.
आपल्या जीवनातला बराचसा वेळ त्याच्यावर जात आहे ज्याचा फायदा हा शून्य आहे.

स्वतःलाच प्रश्न विचारा की आपण दिवसातून किती वेळा whatsapp  ओपन करून बघतो. आपल्या मोबाईल मधील notifications मुळे आपला बराचस असा वेळ वाया जातो. जर मोबाईल मधले नोटिफिकेशनच बंद केले तर काय परिणाम होईल हे जरा observe करा या.सर्वातून एक अशी नकळतपणे स्पर्धा किंवा नकारात्मकता ही भावना तरुणांमध्ये उदयाला येत आहे..

Whatsapp, Facebook, instagram, आणखी बरेच आहेत ते बनवतानाच असे बनवले गेले आहेत की त्याची सवय लागलीच पाहिजे. यामुळे तरुणांची कामातील efficiency कमी झालेली आहे.

आपला डाटा हा विकला जातोय चोरला जातोय आपल्या आवडीनिवडी त्यांना कळत आहेत त्याच्यावरून ते त्यांच्या मार्केटिंग पॉलिसीज बनवतायेत.

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो .जगातील सर्वात जास्त तरुणांची संख्या भारतात आहे पण हा तरुण वर्ग एका वेगळ्याच गोष्टीकडे वळत आहे त्यामध्ये सोशल मीडिया हे मुख्य घटक आहे. वेगवेगळ्या गेम्स किंवा नेटफ्लिक्स वरील वेब सिरीज  यामध्ये तो गुंतलेला आहे.

Comments

Popular posts from this blog

युवक असावा असा !

सोलापुरातील अष्टविनायक पहिला गणपती - श्री विर गणपती तथा विरेश गणपती.